वेळेला किंमत न देणं/आळस करणे
चाणक्य नीतीनुसार, जे लोक खूप आळशी वागतात, जीवनात कष्ट करत नाहीत, ते जमेतेम आयुष्यच जगतात. जे लोक कामापेक्षा आराम करण्यावर लक्ष केंद्रित करतात त्यांना कधीही भरपूर पैसा जमवता येत नाही. आळशीपणामुळे अशा लोकांना जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
महिलांचा अपमान करणारे
आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीनुसार, जे लोक महिलांचा अपमान करतात, त्यांचा अजिबात आदर करत नाहीत त्यांच्यावर देवी लक्ष्मी क्रोधीत होते. या लोकांना जीवनात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. जीवनात गरिबीच पाहावी लागते. सतत महिलांचा अपमान करण्याची सवय सोडून द्या.
advertisement
त्रास द्यायला कुणी कमी केलं नाही! या राशींचे आता उजळणार नशीब;शुक्र-बुध लाभस्थानी
वाईट संगत
जे लोक वाईट संगतीत राहतात आणि वाईट कर्म करतात त्यांच्यावर धन देवता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. या लोकांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या लोकांना पैसे मिळाले तरी ते त्याचा योग्य वापर करत नाहीत.
50 वर्षांनी शनी नक्षत्रात मंगळ! या राशींचा सुवर्णकाळ, आयुष्यात नवी उंची गाठणार
उशिरा झोपणे-उशिरा उठणे
चाणक्य नीतीनुसार, जे लोक उशिरा झोपतात त्यांच्या घरात कधीही संपत्ती टिकत नाही. जास्त वेळ झोपल्याने आयुष्यात अनेक मोठ्या समस्या निर्माण होतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा नसते आणि अनेकदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सवयीमुळे नित्य कामं नीट होऊ शकत नाहीत, ज्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो.