TRENDING:

Chanakya Vichar: या सवयी माणसाला 'वर' येऊ देत नाहीत; चाणक्य टिप्स जीवनात मोठा बदल करतील

Last Updated:

Astro Chanakya Tips: चाणक्य नीतीनुसार, लोकांच्या काही चुकीच्या सवयी त्यांचे पूर्ण आयुष्य खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात. या लोकांनी कठोर परिश्रम केलं तरी पैसा..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आचार्य चाणक्य यांच्याविषयी आपण ऐकलं असेल, ते अतिशय विद्वान होते. त्यांनी चाणक्य नीतीची रचना केली, त्यांची धोरणे आजही लोक आपल्या जीवनात आचरणात आणतात. चाणक्य नीतीनुसार, लोकांच्या काही चुकीच्या सवयी त्यांचे पूर्ण आयुष्य खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात. या लोकांनी कठोर परिश्रम केलं, पैसा कमावला तरी त्यांचे धन टिकू शकत नाहीत. त्यामागचे व्यक्तीच्या चुकीच्या सवयीच कारण असतात. जाणून घेऊया चाणक्यांच्या मते आयुष्य खराब करणाऱ्या चुकीच्या सवयी कोणत्या आहेत.
Chanakya Vichar: या सवयी माणसाला 'वर' येऊ देत नाहीत; चाणक्य टिप्स जीवनात मोठा बदल करतील
Chanakya Vichar: या सवयी माणसाला 'वर' येऊ देत नाहीत; चाणक्य टिप्स जीवनात मोठा बदल करतील
advertisement

वेळेला किंमत न देणं/आळस करणे

चाणक्य नीतीनुसार, जे लोक खूप आळशी वागतात, जीवनात कष्ट करत नाहीत, ते जमेतेम आयुष्यच जगतात. जे लोक कामापेक्षा आराम करण्यावर लक्ष केंद्रित करतात त्यांना कधीही भरपूर पैसा जमवता येत नाही. आळशीपणामुळे अशा लोकांना जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

महिलांचा अपमान करणारे 

आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीनुसार, जे लोक महिलांचा अपमान करतात, त्यांचा अजिबात आदर करत नाहीत त्यांच्यावर देवी लक्ष्मी क्रोधीत होते. या लोकांना जीवनात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. जीवनात गरिबीच पाहावी लागते. सतत महिलांचा अपमान करण्याची सवय सोडून द्या.

advertisement

त्रास द्यायला कुणी कमी केलं नाही! या राशींचे आता उजळणार नशीब;शुक्र-बुध लाभस्थानी

वाईट संगत 

जे लोक वाईट संगतीत राहतात आणि वाईट कर्म करतात त्यांच्यावर धन देवता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. या लोकांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या लोकांना पैसे मिळाले तरी ते त्याचा योग्य वापर करत नाहीत.

advertisement

50 वर्षांनी शनी नक्षत्रात मंगळ! या राशींचा सुवर्णकाळ, आयुष्यात नवी उंची गाठणार

उशिरा झोपणे-उशिरा उठणे 

चाणक्य नीतीनुसार, जे लोक उशिरा झोपतात त्यांच्या घरात कधीही संपत्ती टिकत नाही. जास्त वेळ झोपल्याने आयुष्यात अनेक मोठ्या समस्या निर्माण होतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा नसते आणि अनेकदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सवयीमुळे नित्य कामं नीट होऊ शकत नाहीत, ज्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Chanakya Vichar: या सवयी माणसाला 'वर' येऊ देत नाहीत; चाणक्य टिप्स जीवनात मोठा बदल करतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल