ईशान्य कोपऱ्याचे महत्त्व -
ईशान्य कोपरा वास्तुशास्त्रात भगवान शिवाचे स्थान मानले जाते. हे स्थान जल तत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि देवगुरु बृहस्पतिची ऊर्जा येथे उपस्थित असते. हे घरातील सर्वात पवित्र आणि ऊर्जेचे स्थान मानले जाते. पण, या पवित्र जागेत शौचालय बांधले जाते तेव्हा त्याचा घराच्या सकारात्मक उर्जेवर वाईट परिणाम होतो.
परिणाम काय?
advertisement
कुटुंबातील लोकांची मानसिक स्थिती असंतुलित होऊ लागते.
कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण वाढू लागतो.
तिथे लक्ष्मी राहत नाही आणि कर्जात सतत वाढ होताना दिसते.
मुलांना अभ्यासात रस नसणे अशा समस्या देखील उद्भवतात.
आरोग्य समस्या - सामान्यपणे उपचार करता येत नाहीत अशा.
लग्नात विलंब, वैवाहिक जीवनात तणाव, आरोग्य बिघडणे.
कुटुंबात प्रेमाचा अभाव अशा गोष्टी दिसून येतात.
वास्तुदोषांचा तत्काळ परिणाम होत नाही -
वास्तुदोषांचा तत्काळ परिणाम होत नाही. कधीकधी ते ६ महिने, १ वर्ष, ७ वर्ष किंवा अगदी २१ वर्षांनी वास्तुदोष सक्रिय होतो. म्हणून असे समजू नका की, जर सध्या कोणताही परिणाम होत नसेल तर तो दोष नाही. वास्तुदोष संपूर्ण घराच्या उर्जेवर मंद विषाप्रमाणे परिणाम करतो.
काय करावे?
शक्य असल्यास, शौचालय ईशान्य कोपऱ्यातून काढून योग्य दिशेला हलवा. तिथून काढणे शक्य नसेल तर शौचालयाच्या ईशान्य कोपऱ्यात एका काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवा. दर १५ दिवसांनी ते बदलत राहा.
शौचालयासाठी योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला शौचालय बांधणे सर्वोत्तम मानले जाते. कारण ही विसर्जनाची दिशा मानली जाते.
संघर्ष मोठा केलाय! या राशींचे भाग्य उजळणार; डगमगलो नाही म्हणून इतका पल्ला गाठला
वास्तुनुसार शौचालयाचे रंग -
शौचालयात काळा, गडद निळा आणि लाल असे गडद रंग वापरू नयेत. ऑफ-व्हाइट किंवा बेजसारखे हलके आणि थंड रंग चांगले असतात. दिशेनुसार रंग निवडणे चांगले मानले जाते:
उत्तर दिशा - हलका निळा
पूर्व दिशा - हिरवट
दक्षिण दिशा - गुलाबी किंवा पीच
पश्चिम दिशा - पांढरा
गजलक्ष्मी राजयोग या राशींच्या नशिबात; लवकरच कायापालट करणाऱ्या वार्ता कानी पडणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)