हा मेसेज वाऱ्याच्या वेगानं सगळीकडे पसरत होता. त्यामुळे अनेक दुचाकी चालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दुचाकीस्वारांना महामार्गावर कोणताही टोल भरावा लागत नाही. मात्र या व्हायरल बातम्यांवर आणि मेसेजवर थेट NHAI ने महत्त्वाची सूचना दिली आहे.NHAI ने दुचाकीला टोल भरावा लागणार की नाही, फास्टॅग घ्यावा लागणार की नाही याचं उत्तर देखील ट्विट करून दिलं आहे.
advertisement
FASTag Rs 3000 Annual Pass : FASTag पास घ्यावा की नाही? तुमच्या मानतल्या 7 प्रश्नांची थेट उत्तरं
NHAI ने दिलं थेट उत्तर
NHAI ने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नये. काही माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की भारत सरकार दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याची योजना आखत आहे. NHAI स्पष्ट करू इच्छिते की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांसाठी टोल आकारण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे या केवळ अफवा आहेत. अशा अफवा किंवा मेसेज फॉर्वर्ड करण्याआधी सावध राहा, त्यावर विश्वास ठेवू नका अशा सूचना दिल्या आहेत.
Fastag Update: FASTag मध्ये मोठा बदल! टोलसोबत पार्किंग, EV चार्जिंग आणि विम्यासाठीही लवकरच नवा नियम
फास्टॅग पास कोणासाठी?
फास्टॅग पास हा ज्या लोकांना राष्ट्रीय महामार्गावरुन किंवा एक्सप्रेस वे वरुन सतत प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी फायद्याचा आहे. 200 ट्रिप त्यांना मिळणार आहेत. 3000 रुपये भरुन तुम्ही तेवढ्या ट्रिप पूर्ण करू शकता. 15 ऑगस्टपासून हा पास तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हा पास बंधनकारक करण्यात आलेला नाही. ज्यांना इच्छा आहे तेच घेऊ शकतात, अन्यथा ज्यांना टोल भरुन जायचं आहे ते टोल भरुन जाऊ शकतात. याशिवाय हा पास संपल्यानंतर तुम्ही दुसरा पास काढू शकता. एका वर्षात तुम्ही कितीही पास काढू शकता याची कोणतीही मर्यादा सेट करण्यात आलेली नाही.