जागृती यात्रेद्वारे 500 तरुण तरुणींना भारत दर्शन घडवलं जातं. ही एक वार्षिक सहल आहे. 15 दिवसांच्या या यात्रेत 8000 किलोमीटरचा प्रवास घडतो. आणि 15 शहरांना भेटी देता येतात. या यात्रेदरम्यान देशातील यशस्वी उपक्रम, व्यक्ती यांना भेटी देण्याची संधी तरुण-तरुणींना मिळते. ही यात्रा देशाची राजधानी नवी दिल्लीतून सुरु होते. तिचा पहिला स्टॉप अहमदाबाद आहे. त्यानंतर मुंबई, बेंगळुरू, मदुराई, विशाखापट्टणम आणि परत नवी दिल्ली असा प्रवास करत ती यात्रा संपते. या प्रवासात अनेक तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांना भेटी देता येतात. यात्रेत सहभागी प्रवासी आपल्या इच्छेप्रमाणे ही ठिकाणं पाहू शकतात.
advertisement
जागृती यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रवाशाचं वय 21 ते 27 वर्ष असणं आवश्यक आहे. या वर्षी 16 नोव्हेंबर ते एक डिसेंबर या काळात ही यात्रा होणार आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छुक https://www.jagritiyatra.com/ या लिंक वर अर्ज करु शकतात. त्यानंतर काही महत्त्वाचे निकष लावून यात्रेसाठी प्रवासी निवडले जातात. या यात्रेसाठी अवघ्या 25 रुपयांचं तिकिट आहे.
प्रवास आपलं अनुभवविश्व समृद्ध करतो असं म्हटलं जातं. 15 दिवसांत देशभर सुमारे 8000 किलोमीटरचा प्रवास, विविध ठिकाणांना भेटी देण्याची संधी आणि या प्रवासात देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण-तरुणींशी संवाद साधण्याची संधी हा 21 ते 27 वर्ष वयाच्या तरुणांसाठी एक भन्नाट अनुभव ठरु शकतो, यात शंकाच नाही. प्रवासाची आवड, आपला देश समजून घेण्याचं कुतूहल असलेल्या तरुण तरुणींनी या यात्रेत सहभाग घ्यायला हरकत नाही.