खरं तर, हे प्रकरण बिहारमधील सहर्षा येथील आहे. मनोहर यादव हा आपल्या वहिनीला गेलिया गावात तिच्या माहेरी सोडायला गेला होता. पण त्यानंतर तो घरी परतलाच नाही. मनोहरचा भाऊ आनंद यादवने त्याला विचारले की तो परत का येत नाहीये. तो आपल्या भावाला वेगवेगळी कारणं देत राहिला. नंतर असे समजले की, मनोहरने वहिनीशीच लग्न केले होते. धक्कादायक बाब म्हणजे दीर आणि वहिनीच्या लग्नाला मुलीच्या आई-वडिलांनीच परवानगी दिली होती. हे सर्व कळल्यावर आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो डोक्याला हात लावून रडू लागला.
advertisement
आनंद रडू लागला
मग व्यथित झालेला आनंद पोलिसांकडे गेला आणि त्याने तक्रार केली. आनंदने पोलिसांना सांगितले, "साहेब! माझा भाऊ, बायको आणि सासरचे लोक, सगळ्यांनी मला धोका दिला आहे. माझ्याच बायकोने माझ्या भावाशी लग्न केले. मला माझा भाऊ आणि बायकोचे कारनामे समोर आणायचे आहेत. सर्वांवर कारवाई झाली पाहिजे." त्यानंतर दीर आणि वहिनी दोघेही बेपत्ता झाल्याचे समोर आले.
प्रेमसंबंध आधीच सुरू होते
मात्र, आता पोलिसांनी मोबाईल फोनच्या लोकेशनच्या आधारे दोघांनाही शोधून काढले आहे. पोलिसांनी सांगितले की, दीर आणि वहिनीचे प्रेमसंबंध आधीच सुरू असावेत, असा अंदाज आहे. महिलेचे लग्न एका वर्षापूर्वी झाले होते, परंतु या काळात तिचे दिरासोबत प्रेमसंबंध जुळले होते. तथापि, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. दुसरीकडे, स्थानिक लोक या प्रकरणाबद्दल विविध चर्चा करत आहेत.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडला बोलावलं, आधी संबंध ठेवले, नंतर बाॅयफ्रेंड झाला हैवान, चाकू काढला आणि सपासप केले 15 वार, कारण...
हे ही वाचा : पत्नीचा कांड! लाकडी दांडक्याने ठेचला पतीचा चेहरा, हत्येमागचं कारण ऐकून पोलीस चकित!