भररस्त्यात हत्या झाली, पण कुणीही पुढे आलं नाही
करजखेडा येथील सहदेव पवार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होता. या गुन्ह्यात तो 4 वर्षे शिक्षा भोगत होता. 15 दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. गावी आल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवून हरिबा चव्हाण आणि जीवन चव्हाण यांनी त्याच्यावर हल्ला केला. भर चौकात ही हत्या झाली, पण त्यांच्यातील भांडण सोडवण्यास कुणीही पुढे आलं नाही.
advertisement
शेतीवरून सुरू झाला होता वाद
समोर आलेली माहिती अशी की, सहदेव पवार आणि हरिबा चव्हाण यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरून मोठा वाद झाला होता. पुढे वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. हरिबा चव्हाण यांच्या तक्रारीवरून सहदेव पवार याच्याविरुद्ध 307 चा गुन्हा दाखल झाला होता. 4 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर तो जामीनावर बाहेर आला होता. त्यानंतर भररस्त्यात त्यांच्या गाडीला धडक देत पती-पत्नीची कोयत्याने वार करून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना आरोपींचा शोध सुरू आहे. पण भररस्त्यात पती-पत्नीची हत्या झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : 'आई पत्नीसारखी वाटते, किस केलं...', संतापलेल्या बापाने केला मुलाचा मर्डर, बॉडी नदीत फेकली
हे ही वाचा : Mumbai Crime : नवऱ्याला घरातच संपवण्याचा कट,पण बायको, प्रियकर आणि भाऊ तिंघाच बिंग लेकीनं फोडलं, भयंकर घटना
