नेमकं काय घडलं?
ही घटना मौआईमा चार लेन हायवे जवळ घडली. सुलतानपूरहून लग्नसोहळा आटोपून वऱ्हाडी मंडळी कौशांबीकडे परतत होती. नवरीने लघुशंका करण्याचा बहाणा केला आणि ती गाडीतून उतरली. संधी मिळताच ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. मौआईमा चार लेन हायवेवर वऱ्हाडी मंडळी जवळपास एक तास तिची वाट पाहत थांबली होती. वऱ्हाडी मंडळींनी सांगितलं की, ते गुरुवारी कौशांबीहून सुलतानपूरला लग्नासाठी गेले होते. नवरीचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होतं, त्यामुळे तिची जयमाला आणि सात फेऱ्यांसाठी तयारी नव्हती. पण घरच्यांच्या दबावामुळे ती तयार झाली आणि सगळे विधी पार पडले.
advertisement
नवरीने केला बराच ड्रामा
पाठवणीच्या वेळीसुद्धा नवरीने बराच ड्रामा केला होता. पण समजूत काढल्यानंतर तिला पाठवण्यात आलं. नवरानवरी गाडीतून कौशांबीसाठी निघाले आणि इतर वऱ्हाडींच्या गाड्याही त्यांच्यासोबत येत होत्या. नवरानवरीची गाडी मौआईमा चार लेन हायवेवरील गणेशगंजजवळ पोहोचली, तेव्हा नवरी म्हणाली की, तिला टायलेटला जायचं आहे. यावर नवरदेवाने तिला बाटलीत पाणी दिलं आणि थोड्या अंतरावर असलेल्या झुडपांच्या दिशेने पाठवलं. पण ती एक तास होऊनही परतली नाही.
शोधल्यावर सत्य समोर आलं
यानंतर नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी झुडपांमध्ये तिचा शोध घेतला, पण नवरी तिथे कुठेच नव्हती. जवळ जनावरे चारणाऱ्या गावकऱ्यांना विचारले असता, त्यांनी सांगितलं की, एक नवरी बाईकवरून गेली आहे. ही माहिती फोनवरून सुलतानपूरमध्ये असलेल्या नवरीच्या घरच्यांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी त्यांचे फोन बंद केले. काही वऱ्हाडी रामफल इनारी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पण पोलिसांनी याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांना नवरीच्या घरच्यांशी बोलण्यास सांगितलं. यानंतर वऱ्हाडी नवरीशिवायच कौशांबीला परतले.
हे ही वाचा : पतीला डोळे मिटायला लावले, नंतर प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली निवृत्त अधिकाऱ्याची हत्या, कारण ऐकून चक्रावले पोलीस
हे ही वाचा : दाजीसोबत मेहुणीचं जुळलं सूत, पतीला कळताच विष देऊन संपवलं; 2 वर्षे कुणाला लागली नाही भणक; अखेर...