पत्रकार परिषदेत दिव्याचा एक वेगळाच आक्रमक आणि करारी बाणा पाहायला मिळाला. डोळ्यांत पाणी असूनही तिचा आवाज खंबीर होता. ती म्हणाली, "मी जे बोलले त्याची जबाबदारी मी ठामपणे घेतेय आणि मरेपर्यंत घेत राहिन. जर संपूर्ण महाराष्ट्राला मी चुकीची वाटत असेन, तर मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही यावर मी ठाम आहे. मला जर शिक्षा देत असाल, तर शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा, अशी माझी इच्छा आहे. पण मी अपमानाला सामोरी जाणार नाही. मी स्वाभिमानाने मरेन हा माझा शेवटपर्यंत पण असेल. मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेतेय. शोमध्ये मला पूर्ण बोलू दिलं नाही. तरीही मी एक्सप्लेन करत राहिले." अपमानापेक्षा मृत्यू पत्करण्याची तिची ही भाषा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
'मी मरणाच्या दारात असताना...', घराबाहेर करणाऱ्या 'बिग बॉस'वर दिव्या शिंदेचे धक्कादायक आरोप
दिव्या शिंदेचे बिग बॉसच्या निर्मात्यांवर आरोप
नॅशनल टेलिव्हिजनवर हिंसेची भाषा केल्याचा ठपका ठेवत तिला बाहेर काढलं गेलं, त्यावर दिव्याने स्पष्टीकरण दिलं. "माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला. या संविधानाने चालणाऱ्या देशात कोणी खरंच तलवार घेऊन कोणाला मारायला निघणार आहे का? जे लोक वैचारिक आहेत, त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक असते, स्वाभिमानाची असते. हा माझ्या माजाचा आणि मानाचा विषय होता. मी बिग बॉसला शंभर वेळा सांगितलं की मला घराबाहेरचं बोलायला लावू नका, मला पोक करू नका, पण त्यांनी जाणीवपूर्वक मला कोपऱ्यात ढकललं. तिथे कोणीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं."
दिव्याने बिग बॉसच्या 'क्रिएटिव्ह टीम'वर गंभीर आरोप केले आहेत. तिने दावा केला की, अनेक महत्त्वाची फुटेज प्रेक्षकांपासून लपवण्यात आली. "मी स्वतःहून कन्फेशन रूममध्ये जाऊन सांगितलं होतं की मला हा शो सोडायचा आहे. इथे माझ्या स्वाभिमानाला धक्का लागतोय. पण त्यांनी हे कधीच दाखवलं नाही." असा दावा तिने केला. राकेश बापट, ओमकार राऊत आणि करण सोनावणे यांनी दिव्याची बाजू समजून घेतली होती. राकेशने तर चक्क बिग बॉसला विनंती केली होती की दिव्याची मानसिक स्थिती समजून घ्या. मात्र, निर्मात्यांनी यातील कोणतंही फुटेज दाखवलं नाही, असं दिव्याचं म्हणणं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना दिव्याचे डोळे पाणावले होते. आपली बाजू मांडण्याची संधी न दिल्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं.
