विजय आणि रश्मिकाने आपल्या एका खास संदेशात असं म्हटलं आहे की, 'विरोष' हे नाव कोणत्याही वेडिंग प्लॅनरने किंवा घरच्या परंपरेने दिलेलं नाही, तर ते त्यांच्या लाडक्या चाहत्यांनी दिलेलं आहे. विजय (VI) आणि रश्मिका (ROSH) यांना एकत्र पाहून चाहत्यांनी हे नाव तयार केलं होतं. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सोहळ्याला चाहत्यांनी दिलेल्या नावाशी जोडून, या जोडीने हे सिद्ध केलंय की त्यांचे पाठीराखे केवळ प्रेक्षक नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत.
advertisement
चाहत्यांसाठी रश्मिकाचा खास मेसेज
रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक मनाला भिडणारी पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलंय, "आमच्या लाडक्या चाहत्यांनो, आम्ही काहीही प्लॅन करण्याआधीपासूनच तुम्ही आमच्या सोबत होतात. इतक्या प्रेमाने तुम्ही आम्हाला एक नाव दिलंत, 'विरोष'. म्हणूनच आज, आम्ही आमचं हे नातं तुमच्या सन्मानार्थ याच नावाने ओळखणार आहोत, 'विरोष की शादी'. तुम्ही दिलेल्या या अफाट प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही नेहमीच आमच्या सोबत असाल. खूप खूप प्रेम!"
रश्मिका आणि विजयची ही लव्हस्टोरी संघर्षातून आणि सावरण्यातून फुलली आहे. ३ जुलै २०१७ रोजी रश्मिकाचा अभिनेता रक्षित शेट्टीशी साखरपुडा झाला होता, मात्र सप्टेंबर २०१८ मध्ये काही कारणास्तव हे नातं तुटलं. त्यानंतर रश्मिकाच्या आयुष्यात विजयची एंट्री झाली. २०१८ पासून हे दोघे डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांतून त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री सुपरहिट ठरली आणि आता हीच केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही कायमची स्थिरावणार आहे. लवकरच हे दोघं 'रणबाली' या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
