TRENDING:

Pahalgam Terrorist Attack : 'एकाही निरपराध्याला मारणे म्हणजे...' पहलगाम हल्ल्यावर सलमान खान भडकला

Last Updated:

Pahalgam Terrorist Attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे सलमान खानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीर स्वर्ग होता, पण आता नरक बनत चालला आहे असे त्याने म्हटले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र दुःख आणि क्रोधाचे वातावरण पसरले आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेही या घटनेवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, काश्मीर जो पृथ्वीवरील स्वर्ग होता, तो आता नरक बनत चालला आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे सलमान खानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे सलमान खानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement

बुधवारी दुपारी सलमान खानने एक्सवर लिहिले, "काश्मीर, जो पृथ्वीवरील स्वर्ग होता, तो नरक बनत चालला आहे. निरपराध लोकांना लक्ष्य केले जात आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. एकही निरपराध व्यक्ती मरणे म्हणजे समस्त सृष्टीला मारण्यासारखे आहे."

सलमान खानने त्यांच्या संदेशात म्हटले की अशा घटना देशाला तोडण्याचा प्रयत्न आहेत, परंतु भारत हा असा देश आहे जो प्रत्येक वेळी अधिक मजबूत होऊन उदयास येतो. त्यांनी हेही सांगितले की या कठीण काळात सर्व भारतीयांनी एकत्र येऊन शांतता, सहनशीलता आणि भाईचाऱ्याचे उदाहरण दाखवायला हवे.

advertisement

सिनेमा केला त्यावेळी आमच्यावर टीका झाली पण आता... काश्मीर फाईलच्या निर्मात्याचा संताप अनावर, 'फक्त हिंदूंना...'

सलमान खानच्या या पोस्टवर यूजर्सनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी सलमान खानचे आभार मानले तर काहींनी त्यांच्या उशिरा आलेल्या प्रतिक्रियेवर प्रश्न विचारले. एका यूजरने लिहिले- तुम्ही खूप चांगले बोललात भाई. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की भाई, तुम्ही खूप निडर आहात.

advertisement

मंगळवारी दुपारी साधारण 3 वाजता पहलगामच्या बैसरन व्हॅलीत जेव्हा हजारो पर्यटक सुंदर निसर्गसौंदर्यात फिरत होते, त्याचवेळी काही दहशतवाद्यांनी लोकांवर गोळीबार करायला सुरुवात केली. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. काही पीडितांनी दावा केला की हल्लेखोरांनी धर्म विचारून लोकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 28 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

हल्ल्यानंतर सरकारने त्वरित कारवाई केली आहे. काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह मंगळवारी रात्रीच काश्मीरला पोहोचले होते, बुधवारी त्यांनी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली दिली.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Pahalgam Terrorist Attack : 'एकाही निरपराध्याला मारणे म्हणजे...' पहलगाम हल्ल्यावर सलमान खान भडकला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल