TRENDING:

4 किमो, 2 सर्जरी, इन्शुरन्स कंपनीकडून फसवणूक; कॅन्सरने अशी झाली होती विजय कदम यांची अवस्था

Last Updated:

कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देणं सर्वसामान्यांसाठी किती कठीण होतं हे विजय कदम यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांची पत्नी पद्मश्री जोशी यांनी त्यांना या काळात खूप मोठी साथ दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच निधन झालं. ते मागील एक ते दीड वर्षांपासून कॅन्सर सारख्या आजाराचा सामना करत होते. त्यांच्या जाण्यानं मराठी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. काही महिन्यांआधी त्यांनी त्यांच्या कॅन्सरचा आजार, ट्रिटमेंटवर भाष्य केलं होतं. कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देणं सर्वसामान्यांसाठी किती कठीण होतं हे त्यांनी सांगितलं. या काळातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. त्यांची पत्नी पद्मश्री जोशी यांनी त्यांना या काळात खूप मोठी साथ दिली.
विजय कदम
विजय कदम
advertisement

पद्मश्री जोशी यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत कॅन्सरच्या ट्रिटमेंटवेळी आलेल्या आव्हानांबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, "पहिली मदत देवाची झाली. ज्या वेळेस तुमच्यावर संकट येतात तेव्हा तो तितकीच संकट देतो जी सहन करण्याची तुमच्यात ताकद आहे.मानसिक खंबीरपणा कसा ठेवायचा, त्याला मानसिक सपोर्ट कसा द्यायचा या दृष्टीने मी आणि माझा मुलगा करत होते. इंडस्ट्रीत आम्ही कोणाला सांगितलं नाही. त्याच्या पहिल्या चार किमो झाल्या नंतर दोन सर्जरी झाल्या. त्यानंतर मी विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांना सांगितलं. हे त्रिकुट आहेत त्यामुळे त्यांना माहिती असलं पाहिजे होते. बाकी कोणाला कळू दिलं नाही".

advertisement

( Hina Khan : 'पाय सुन्न पडले तरी...' कॅन्सरशी झुंज, आजारपणातही हिना खानने सोडलं नाही हे काम; तुम्ही कराल कौतुक )

"एका वेळेस मुख्यमंत्र्यांच्या मदतीची आम्हाला गरज होती तेव्हा आम्ही सुशांत शेलार आणि मंगेश यांना फोन केला. त्यांनी मला मदत केली. मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं त्यांनी मदत केली. पण संकट येतात तेव्हा ती दोन्ही बाजूने येतात. विजयचं पहिलं किमो करायचं ठरलं. त्यानंतर पहिला फोन मी इन्शुरन्स कंपनीला केला. त्यांना सगळं सांगितलं. आम्ही नानावटी रुग्णालयात किमो करायचं ठरवलं. त्यांच्या लिस्ट ऑफ कॅश लेस रुग्णालयात नानावटी रुग्णालय होतं".

advertisement

त्यांनी पुढे सांगितलं, "इन्शुरन्स कंपनीशी बोलून मी कॅशलेस फॉर्म भरला. फेब्रुवारी महिन्यात ट्रिटमेंट सुरू झाली. मला लेटर आलं की तुमचा इन्शुरन्स अप्रुव करू शकत नाही कारण त्यांना डायबिटिज आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. मी त्यांना दाखवलं तुमच्या पहिल्या पेजवर लिहिलंय की 14 वर्षांपासून त्याला डायबिटीज आहे".

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीत अपयश का येते? कोणत्या होतात व्यावसायिक चुका, कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
सर्व पहा

"विमा लोकपालमध्ये केस केली. तारखेला जाऊन उभी राहत होते केस लढले, निकाल माझ्या बाजूने लागला तरीही ते पैसे भरायला नव्हते. त्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांची मदत घेतली", असंही त्यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
4 किमो, 2 सर्जरी, इन्शुरन्स कंपनीकडून फसवणूक; कॅन्सरने अशी झाली होती विजय कदम यांची अवस्था
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल