साखरयुक्त पदार्थ टाळाच
यामध्ये साखर आणि शुगर-युक्त पदार्थ म्हणजेच साखर, सोडा, मिठाई आणि केक यामध्ये जास्त शर्करा असते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी लवकर वाढते आणि त्यांनीच इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
कॅन्सरच नव्हे तर कोणताच आजार होणार नाही, रोज सकाळी हळदीचं पाणी पिण्याचे फायदे माहितीये का?
तेलकट खाणं नको
advertisement
तळलेले पदार्थ यामध्ये समोसा, पकोडी, फ्रेंच फ्राईस हे पदार्थ टाळावे या तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त फॅट्स आणि कॅलोरीज असतात. यामुळे वजन वाढू शकते आणि शर्करेचा स्तर नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते.
भात आणि भाकरी
पांढरे अन्नपदार्थ जसे की पांढरा भात आणि पांढरी भाकरी हे रक्तातील शर्करा लवकर वाढवतात. त्याऐवजी संपूर्ण धान्याचे पदार्थ (उदा. ओट्स, बाजरी) खाणे चांगले.
जंक फूड
तसेच प्रक्रियायुक्त अन्न म्हणजेच जंक फूड आणि इंस्टंट नूडल्स यामध्ये ट्रान्स फॅट्स आणि सोडियम जास्त असतात. यामुळे रक्तदाब आणि शर्करेची पातळी असंतुलित होऊ शकते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.
तिखट आणि मसालेदार
तिखट मसालेदार पदार्थ खाणं ही टाळवं. जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचनावर परिणाम होतो आणि इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अति साखरयुक्त अन्नपदार्थांचे सेवन, मानसिक ताण आणि अनुवंशिकता ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. मधुमेह केवळ औषधांवर नियंत्रणात येणारी स्थिती नाही, तर ती संपूर्ण जीवनशैलीच्या बदलावर आधारित आहे. त्यामुळे तुमचा आहार तंतू, प्रोटीन आणि निरोगी फॅट्स असलेला असावा. ताज्या भाज्या, फळांचा समावेश करा. भाज्या आणि फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात, जे शरीराच्या एकूण कार्यक्षमतेस मदत करतात. यामुळे मधुमेहाचे नियंत्रण करणे सोपे होईल.