Monsoon Care : पावसाळ्यात घ्या पोटाची काळजी, काय आहे आयुर्वेदिक तज्ज्ञांचं मत ?
डॉ. श्वेता शाह यांच्या म्हणण्यानुसार, पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेटेड वाटत असेल, तर फक्त साधं पाणी पिऊ नका, तर पाण्यासोबत शरीराला सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स द्या.
मग डिहायड्रेटेशन टाळण्यासाठी कसं पाणी प्यावं हा प्रश्न उरतोच. यासाठी, त्यांनी पाण्यात रॉक मीठ मिसळून ते पिण्याची शिफारस केली आहे.
advertisement
Insects : घरातल्या धान्याची अशी घ्या काळजी, किडे होतील गायब
डॉ. श्वेता शाह यांच्या सल्ल्यानुसार, विशेषतः व्यायाम करत असाल, योगा करत असाल किंवा खूप गरम वाटत असेल तर एक लीटर पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ मिसळा आणि दिवसातून एकदा प्या. यामुळे शरीराला आवश्यक खनिजं मिळतील ज्यामुळे शरीर पाणी लवकर शोषू शकेल.
डिहायड्रेशन टाळण्यासाठी त्यांनी आणखीही काही टिप्स दिल्यात -
- आठवड्यातून एकदा ओआरएस किंवा इलेक्ट्रोलाइट पावडर मिसळून पाणी पिण्याची शिफारस डॉक्टरांनी केली आहे. यामुळे शरीरातील खनिजं संतुलित राहतात.
- या व्यतिरिक्त, आहारात काकडी, टरबूज, संत्री, नारळ पाणी यासारख्या घटकांचा समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळेही शरीराला हायड्रेशन मिळतं.