TRENDING:

Health Tips: सांधेदुखी अन् त्वचा लालसर होतीये? वेळीच व्हा सावध, हा आजार ठरू शकतो घातक

Last Updated:

पावसाळ्यामध्ये अनेकवेळा आपल्या गुडघ्यावर अचानक लालसरपणा जाणवतो. त्रास होण्यास सुरुवात होते. हात पायांमध्ये वेदना होतात. अशावेळी आपण एखादी पेन किलर घेऊन दुखणे टाळतो. पण, ती वात व्याधीची लक्षण असू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती: पावसाळ्यामध्ये अनेकवेळा आपल्या गुडघ्यावर अचानक लालसरपणा जाणवतो. त्रास होण्यास सुरुवात होते. हात-पायांमध्ये वेदना होतात. अशावेळी आपण एखादी पेन किलर घेऊन दुखणे टाळतो. पण, ती वात व्याधीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच काही बाबींची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. वात व्याधीची लक्षणे कोणती? वात व्याधी असल्यास कोणती काळजी घ्यावी? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.
advertisement

वातव्याधीची लक्षणे कोणती?

वात व्याधीची लक्षणे कोणती? वात व्याधी असल्यास कोणती काळजी घ्यावी? याबाबत माहिती देताना डॉ. आंडे सांगतात की, पावसाळ्यात वात व्याधी जास्त प्रमाणात वाढते. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे सांधेदुखी, अंगावर सूज येणे, त्वचा लालसर होणे, दुखणे, छोटे-मोठे जॉइंट दुखणे, कणकण वाटणे अशी अनेक लक्षणे आढळून येतात. अनेकदा या लक्षणावर दुर्लक्ष केले जाते. पण, काही वेळा ही लक्षणे रुग्णांना कायमच जागेवर बसवू शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

advertisement

Health Tips: चहा पिल्यानंतर जिभेवर पांढरा थर जमा होतोय? ठरू शकते हानिकारक, अशी घ्या काळजी

कोणती काळजी घ्यावी?

वात व्याधी असणाऱ्या रुग्णांनी पावसाळ्यात थंड पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर घरातील कामे करताना सुद्धा थंड पाण्यासोबत जास्त संपर्क येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पाणी उकळून पिणे सुद्धा सुरू करायला पाहिजे. त्याचबरोबर आंघोळीला सुद्धा गरम पाणी घ्यायला पाहिजे. थंड पाण्यासोबत संपर्क कमी झाला की, वात व्याधी नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होईल.

advertisement

आहारात कशाचा समावेश असावा?

त्याचबरोबर आहारात गरम पदार्थांचा समावेश करू शकता. त्यामध्ये मिरे, लसूण, अद्रक आणि इतरही काही पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता. त्याचबरोबर योगा करणे, योग्य आहार घेणे, पुरेशी झोप घेणे सुद्धा गरजेचे आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागात सूज आली असेल किंवा दुखत असेल आणि याला 7 दिवसांवर दिवस झाले असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या काही टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला नेमका कोणत्या प्रकारचा वात आहे, हे लक्षात येईल. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शरीरात काही बदल जाणवल्यास किंवा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. धीरज आंडे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: सांधेदुखी अन् त्वचा लालसर होतीये? वेळीच व्हा सावध, हा आजार ठरू शकतो घातक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल