असं म्हटलं जातं की जेव्हा युद्ध निश्चित होतं तेव्हा श्रीकृष्णाने देशभर आपले दूत पाठवले होते. त्यांना या महायुद्धासाठी सर्वात योग्य अशी जमीन शोधावी लागली. भावंडांमध्ये, गुरु-शिष्यांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये युद्ध पाहून लोक भावनिक होतील आणि युद्ध थांबवतील अशी भीती श्रीकृष्णाला होती, म्हणून त्यांना अशा जागेची आवश्यकता होती जिथं राग आणि द्वेषाच्या भावना इतक्या खोलवर रुजल्या असतील की युद्धादरम्यान या भावना वर्चस्व गाजवतील.
advertisement
Mahabharat : आईच्या गर्भातच चक्रव्यूहचं ज्ञान, तरी त्यात कसा अडकला अभिमन्यू?
जेव्हा दूतांनी कुरुक्षेत्राबद्दल सांगितलं तेव्हा श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले. त्यांना सांगण्यात आलं की कुरुक्षेत्रात एका भावाने त्याच्या धाकट्या भावाची हत्या केली कारण त्याने शेताची सीमा भिंत तोडण्यास नकार दिला होता. रागाच्या भरात मोठ्या भावाने धाकट्या भावावर चाकूने वार केले आणि त्याचा मृतदेह ओढत तुटलेल्या बांधावर फेकून दिला.
ही घटना ऐकून श्रीकृष्णाला समजलं की कुरुक्षेत्र हेच ते ठिकाण आहे जिथं महाभारताचे युद्ध लढलं पाहिजे. या भूमीवर इतकं रक्त सांडलं गेलं होतं की ती युद्धासाठी पूर्णपणे योग्य होती. येथील मातीत राग आणि द्वेषाच्या भावना इतक्या खोलवर रुजल्या होत्या की जर इथं युद्ध झालं तर दया किंवा करुणेची भावना निर्माण होणार नाही.
Mahabharat : महाभारत काळात कुंतीला मिळालेला शाप, आजही कायम, भोगत आहेत सगळ्या महिला
कुरुक्षेत्र निवडण्यामागे आणखी एक कारण दिलं जातं. असं म्हटलं जातं की भगवान इंद्र एकदा कुरुक्षेत्रात आले होते. त्यांनी कुरुंना विचारलं होतं की ते ही जमीन का नांगरत आहेत? कुरुंनी म्हटलं होतं की या भूमीवर जो कोणी मारला जाईल तो स्वर्गात जाईल. भगवान इंद्र यांनी यावर सहमती दर्शवली होती, म्हणून भीष्म, कृष्ण आणि इतर योद्ध्यांना माहित होते की या भूमीवर जो कोणी मारला जाईल तो स्वर्गात जाईल.