TRENDING:

Laziness : हिवाळा आहे म्हणून आळसावू नका, कमी हालचालींमुळे प्रकृतीवर होतील गंभीर परिणाम

Last Updated:

“व्यायामत लभते स्वस्थं दीर्घायुष्यं बलम् सुखम्,” असं चरक संहितेत म्हटलं आहे, म्हणजेच व्यायामामुळे आरोग्य, दीर्घायुष्य, शक्ती आणि आनंद मिळतो, पण शरीर कमी हालचाल करत असेल तर लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखे अनेक आजार शरीराला घेरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळा म्हणजे थंडी आणि अनेकदा थंडीमुळे आलेला आळसावलेपणा. थंडीत पांघरुणातून बाहेर पडणं नको वाटतं. काही वेळ असं वाटलं तरी यामुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.
News18
News18
advertisement

आळसावलेल्या जीवनशैलीमुळे मेंदूच्या वापरावर आणि शारीरिक हालचालींवर परिणाम होतो. कारण कमी शारीरिक हालचाली शरीराला आजारी पाडण्यासाठी पुरेशी आहेत. आयुर्वेदात कमी शारीरिक हालचाली म्हणजे शरीरासाठी धोक्याची घंटा मानली जाते.

Instagram Feature : इन्स्टाग्रामचं लिप सिंक फिचर वापरलंत का ? व्हिडिओसाठी बेस्ट

आयुर्वेदानुसार, "अति योग, हीन योग आणि मिथ्या योग ही रोगाची मूळ कारणं आहेत." आयुर्वेदात, शरीराला कर्मयोगाचं साधन मानलं जातं. शरीराची हालचाल थांबली तर वात आणि कफ दोन्ही असंतुलित होतात. हालचालींच्या अभावामुळेही शरीरात असंतुलन निर्माण होतं.

advertisement

यामुळे कफ दोष वाढतो, वात दोष खराब होतो, पित्त दोषावर परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीरात गंभीर आजार निर्माण करण्यासाठी हे पुरेसं आहे.

“व्यायामत लभते स्वस्थं दीर्घायुष्यं बलम् सुखम्,” असं चरक संहितेत म्हटलं आहे, म्हणजेच व्यायामामुळे आरोग्य, दीर्घायुष्य, शक्ती आणि आनंद मिळतो, पण शरीर कमी हालचाल करत असेल तर लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखे अनेक आजार शरीराला घेरतात.

advertisement

Knee Pain : हिवाळ्यातच सांधे, गुडघे जास्त का दुखतात ? जाणून घेऊया कारणं, उपचार

एखादी व्यक्ती बराच वेळ बसून राहिली तर शरीरात चरबी जमा होते आणि शरीराची चयापचय क्रिया कमकुवत होते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार होण्याची शक्यता वाढते.

दुसरं म्हणजे, बराच वेळ एकाच स्थितीत राहिल्यानं संधिवात आणि सांधेदुखीलाही आमंत्रण मिळतं. हाडांपासून स्नायूंपर्यंत कडकपणा त्रासदायक ठरू लागतो आणि हाडांचे सांधे सतत एकाच स्थितीत राहिल्यामुळे सांधेदुखीचाही त्रास होतो.

advertisement

तिसरं म्हणजे, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. चालण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

आणि रक्तासोबत ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचतो, पण असं झालं नाही तर रक्त आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रक्तदाबाचा आजार शरीराला वेढतो. रक्तदाबाच्या समस्यांमुळे हृदयरोग, नैराश्य आणि चिंता, पचनाचे विकार आणि कमकुवत प्रतिकारशक्तीचा धोका वाढतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Laziness : हिवाळा आहे म्हणून आळसावू नका, कमी हालचालींमुळे प्रकृतीवर होतील गंभीर परिणाम
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल