Dharashiv Nagar Parishad : बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : धाराशिव नगरपालिका निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने मोठी खेळी केली आहे. शिवसेने सोबत युती करत असल्याच सांगत थेट 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या घटनेने धाराशिव नगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती फुटली आहे. तसेच या घटनेनंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
advertisement
धाराशिव नगरपालिका निवडणुकीत सुरूवातीपासून भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्रितपणे निवडणुक लढवणार होते. या संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये तशा चर्चा देखील झाल्या होत्या. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी युती करू आम्हाला 17 जागा देण्याचं कबूलही केलं होतं. त्याचबरोबर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देखील दिला होता. मात्र आता भाजपने अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 17 उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याऐवजी आमच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरुज साळुंखे यांनी केला आहे. या घटनेने शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मोठा दगाफटका झाला आहे.
आमदार राणा पाटील यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असून आम्हाला धोका दिला आहे ही बाब आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देत उद्या सकाळी नगरपालिका निवडणुकीत कुठल्या अध्यक्षपदाला पाठिंबा द्यायचा का? स्वतंत्र लढायचं याबाबत भूमिका स्पष्ट करून असे शिवसेना नेत्याने सांगितले आहे.
दरम्यान धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत फॉर्म काढून घेण्याच्या शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडली असून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची युती संपुष्टात आली आहे
