पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील हेळंब गावातील गोविंद भारती यांनी 12 फेब्रुवारी रोजी ‘डायल 112’ वर संपर्क साधून पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. या कॉलची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचारी तात्काळ संबंधित गावाकडे रवाना झाले. आपत्कालीन सेवेला आलेली माहिती गंभीर असल्याने पोलिसांनी कोणताही विलंब न करता चौकशी सुरू केली.
advertisement
HSC Exam 2026: ‘तिसऱ्या डोळ्या’नं पकडला ‘तो’ कारनामा, 17 शिक्षकांवर थेट कारवाई, बीडमध्ये काय घडलं?
घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आढळून आली. अधिक विचारपूस केल्यानंतर पत्नी बेपत्ता नसून त्या माहेरी गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेचा वेळ आणि मनुष्यबळ वाया गेल्याचेही समोर आले.
यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेत परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. खोटी माहिती देऊन आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याप्रकरणी 14 फेब्रुवारी रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सय्यद मजहर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, आपत्कालीन क्रमांकावर खोटी माहिती देणे हा गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांमुळे खऱ्या आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी आपत्कालीन सेवांचा जबाबदारीने वापर करावा, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






