राजुरी मळा येथील रहिवासी एकनाथ पवार (वय 40) हे उदरनिर्वाहासाठी ऊसतोडीचे काम करत होते. शुक्रवारी दिवसभर कष्टाचे काम आटोपून सायंकाळी ते पायी आपल्या घरी परतत होते. गेवराई–माजलगाव रस्त्यालगत ते चालत असताना गेवराईकडून माजलगावच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. अचानक झालेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली.
advertisement
Pune Crime: कुत्र्यासाठी एकमेकांशी भिडले पुण्यातील तरुण; रस्त्यावरच दगड, दांडक्याने जीवघेणा हल्ला
धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, एकनाथ पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्यावरच त्यांनी प्राण सोडल्याने उपस्थित नागरिकांनी शोक व्यक्त केला. अपघातानंतर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र पवार यांचे प्राण वाचवणे शक्य झाले नाही.
या अपघातात दुचाकीस्वार तुषार चंद्रकांत जगताप (वय 25, रा. शेलू मारफळा) हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच तलवाडा बीटचे अंमलदार अंजन गडदे आणि चालक पवन शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण आणि वेगाची माहिती तपासातून स्पष्ट केली जाणार आहे.






