नेमकी घटना काय?
राजेश हा गेल्या तीन वर्षांपासून चंद्रपूर येथील दालमिया कंपनीत 'सिक्युरिटी गार्ड' म्हणून नोकरीला होता. त्याचं लग्न १६ मार्च रोजी एरंडी येथील वैष्णवी राजू दोनोडे हिच्याशी होणार होतं. लग्नासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने घरात लग्नाची लगबग सुरू होती. मात्र, गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास राजेशने घराबाहेरील आंब्याच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
नवरी मुलगीही घरीच होती
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे सामान आणि कपड्यांची खरेदी करण्यासाठी नवरी मुलगी वैष्णवी ही सुद्धा ११ मार्च रोजी राजेशच्या घरी आली होती. दोघांच्याही घरात लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात असताना राजेशनं असं टोकाचं पाऊल का उचललं, याचं गूढ निर्माण झालं आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. राजेशच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
