TRENDING:

'खरात प्रकरण आम्हीच बाहेर काढलं, सर्वाधिक पुरावे माझ्याकडे...', CM फडणवीसांनी सांगितली Inside Story

Last Updated:

Devendra Fadnavis Reaction on Ashok Kharat: नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला अटक केल्यापासून त्याच्याबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. आता यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Devendra Fadnavis Reaction on Ashok Kharat: नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला अटक केल्यापासून त्याच्याबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. त्याच्या विकृत कृत्यांसह त्याचे राजकीय कनेक्शन्स देखील बाहेर येत आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. आता या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित प्रकरणाचा आम्हीच भांडाफोड केला, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. त्यांनी हे प्रकरण कसं बाहेर आलं? याची इनसाईड स्टोरी सांगितली आहे.
ashok kharat and devendra fadnavis
ashok kharat and devendra fadnavis
advertisement

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. याबाबतचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

"खरातचा भांडाफोड आम्हीच केला"

खरात प्रकरणावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, "खरात यांचं प्रकरणं अत्यंत गंभीर आहे. इंटेलिजन्सच्या आधारवर आम्ही स्वत: याचा भांडाफोड केला आहे. आम्हाला आधीच कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला पुढे येत नाहीत. आता पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांना समोर आणायचा प्रयत्न सुरू आहे. यात यशही येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जात आहे. स्वत: डीजींनी याकडे लक्ष द्यावं, अशा सूचना मी दिल्या आहेत. एसआयटी तयार केली आहे. यात कुणालाही सोडलं जाणार नाही."

advertisement

"याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाकडे काही पुरावा असेल तर त्यांनी निश्चित आणून द्यावा, त्याच्यावर कारवाई होईल, विनाकारण राजकीय रंग देऊ नये", असंही फडणवीस म्हणाले

'सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

फडणवीसांनी पुढे सांगितलं की, "खरातकडे अनेक राजकीय लोक जायचे, विरोधकही जायचे. विरोधक कोण कोण गेले, याचे पुरावे मी देऊ शकतो. सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत. ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाहीये. पण खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, फक्त कुणीतरी भेटलं म्हणून कारवाई करता येणार नाही, असं केलं तर अनेकांची नावं समोर येतील. त्यांना ४० किमी पाण्याची लाईन कुणी आणि कशी दिली, याबाबत काल मीडियांनी दाखवलं आहे. त्यामुळे याचं राजकारण करू नये. हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. त्यामुळे आरोपींना शिक्षा भोगावीच लागेल, यासाठी सरकार आणि पोलिसांना जे करावं लागेल, ते सगळं करू."

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'खरात प्रकरण आम्हीच बाहेर काढलं, सर्वाधिक पुरावे माझ्याकडे...', CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल