विकास कामांना स्थगिती देणारा आणि सरकारच्या कानात सांगणारा झारीतील शुक्राचार्य नेमका कोण आहे, हे उघड सांगा, असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विचारला. यावर ज्याला ही माहिती हवी आहे, त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जावे. काम वाटपात गैरप्रकाराच्या तक्रारी आल्यामुळेच स्थगिती देण्यात आली आहे, असे आमदार राणा पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
advertisement
दोघांचा वाद पाहून पालकमंत्री प्रताप सरनाईक संतापले. स्थगित केलेला निधी रद्द होणार नाही. जर मी पालकमंत्री नकोसा वाटत असेल, तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र द्या, अशा शब्दात दोघांच्या वादावर सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, तुळजापूर ड्रग्स प्रकरणातही वाद चिघळला. या प्रकरणात कोणत्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे, हे उघड करा, असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी विचारला. त्यावर बोलताना, माझ्याच सांगण्यावरूनच या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. काहीजण या प्रकरणावर राजकारण करत आहेत, त्यांना विचार करण्याची गरज आहे, असे आमदार राणा पाटील म्हणाले.
बैठकीत वाढत चाललेल्या वादामुळे अखेर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हस्तक्षेप करत दोघांनाही शांत केले. जिल्ह्यातील विकास कामांवर राजकारण न करता एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.