मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मायलेक गेल्या दोन दिवसांपासून खाजगी सावकारांकडून होणाऱ्या मारहाणीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आनंदनगर पोलीस ठाण्यात चकरा मारत होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही. वारंवार उडवा-उडवीची उत्तरे दिल्यामुळे अखेर वैतागलेल्या माय-लेकरांनी पोलिस ठाण्याच्या परिसरातच उंदर मारण्याचे औषध सेवन केले.
या घटनेनंतर पोलिस विभागावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर प्रकरणावर अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
advertisement
ही घटना पोलिसांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
July 10, 2025 10:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv: दोन दिवसांपासून तक्रार घेतली नाही, माय लेकराने पोलिस ठाण्यातच विष घेतले