बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील वैद्य कुटुंबात लग्न सोहळ्याची लगबग होती. 8 मार्च रोजी सुखदेव वैद्य यांच्या मुलीचा विवाह निश्चित झाला होता. त्यामुळे ते आपल्या पत्नीसह नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी जालन्याकडे जात होते. याचवेळी बदनापूर येथील दुधना नदीच्या पुलाजवळ भीषण अपघात झाला.
घरात कुणी नव्हतं, जावा-जावांचं बिनसलं, बार्शीत भयंकर घडलं, आता जन्माची अद्दल!
advertisement
वैद्य यांच्या दुचाकीला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात सुखदेव यांचा जागीच मृत्यू झाला, तर वर्षा वैद्य या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांत रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढलेले अवैध धंदे आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन यामुळे रस्ते वाहतूक अनियंत्रित झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. लेकीच्या लग्नाआधीच वडिलांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.






