TRENDING:

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी का घेतला युटर्न? आता पुढे काय करणार

Last Updated:

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आले आहे. संचारबंदीनंतर अंतरवालीमधील मंडप रिकामा करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी जैस्वाल, जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईला सागर बंगल्यावर जाण्यासाठी रविवारी निघाले होते. जरांगे पाटील आक्रमक झाल्याने अंतरावालीसह जालना जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं. अंतरवालीतून निघाल्यानंतर जरांगे पाटील यांनी भांबेरी गावात मुक्काम केला. तिथून आज सकाळी ते मुंबईला जाण्याऐवजी अंतरवाली सराटीला परतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आपण अंतरवाली सराटीत उपचार घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व मराठा बांधवांनी आपआपल्या घरी परतावे असं आवाहनही त्यांनी केलंय.
मनोज जरांगेंनी का घेतला युटर्न?
मनोज जरांगेंनी का घेतला युटर्न?
advertisement

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आले आहेत. संचारबंदीनंतर अंतरवालीमधील मंडप रिकामा करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारी डॉक्टरकडून उपचार घेतले आहेत. त्यांनी सलाईन घेत संयमाची भूमिका घेतलीय. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकांना जरांगे पाटील यांनी माघारी पाठवले असून अंतरवाली सराटीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

advertisement

“मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मराठा बांधवांनी आपआपल्या घरी जावं. मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन. सगळ्यांनी शांततेत आपआपल्या गावी जावं.” मनोज जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईला जाणे टाळले. पुन्हा अंतरवाली सराटीकडे फिरले. कायद्याचा आणि पोलिसांचा सन्मान म्हणून एक पाऊल मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलं.  तसंच देवेंद्र फडणवीस घाबरले आणि त्यांनी संचारबंदी लावल्याचा आरोप केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू केली गेलीय. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केलीय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी का घेतला युटर्न? आता पुढे काय करणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल