पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपाली ही मुळची कल्याण येथील रहिवासी आहे. ती काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली होती. परंतु काही तास उलटून गेल्यावरही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध करायला सुरूवात केली. दिपाली ज्या रिक्षाने लॉजवर गेली होती त्या रिक्षा चालकाची चौकशी केली आज आहे. रिक्षाचालकाने तिला साई लॉजवर सोडल्याची माहिती समोर आली आहे.लॉजवर गेल्यानंतर दिपालीच्या पाठोपाठ संदिप देखील तिथे पोहचल्याचे समोर आले आहे.
advertisement
रोहित पवारांनी काय आरोप केला?
त्यानंतर आता रोहित पवारांनी ट्वीट करत खळबळजनक आरोप केला आहे. संदीप गायकवाडने दिपालीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आहे. संदीप गायकवाडचे लग्न झाले होते. लग्न झालेले असतानाही तो दिपालीवर लग्न करण्यासाठी दबाव आणत होता. यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे रोहित पवार म्हणाले.
महिलेला न्याय मिळवून देण्याची रोहित पवारांची मागणी
रोहित पवार पुढे म्हणाले, या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढं आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा. एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईने लक्ष राहणार आहे.
सखोल तपास करण्याची गरज
दिपाली पाटील आत्महत्येनंतर मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज, फोन कॉल डिटेल्स आणि दिपालीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशी या सर्व गोष्टी तपासाचा मुख्य भाग ठरणार आहेत. यातूनच नृत्यांगनेच्या मृत्यूमागील रहस्य उलगडण्यास मदत होईल, असे पोलीस म्हणाले आहे
