अतिवृष्टीमुळे स्थळांतरित झालेल्या नागरिकांना 'मैत्री केटरर्स' नावाने व्यवसाय असलेल्या एका ठेकेदाराने नाश्ता पुरवला होता. त्याने दिलेल्या खाद्यपदार्थामध्ये अळ्या सापडल्या होत्या. ही बाब उघड झाल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्याकडे खुलासा मागितला होता. अतिपावसामुळे नाश्त्यात अळ्या सापडल्या, असं स्पष्टीकरण या ठेकेदारानं दिलं आहे. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.
Weather Alert: मुंबई-ठाण्यात हवापालट, कोकणात पुन्हा यलो अलर्ट, रविवारचा हवामान अंदाज
advertisement
ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार, पालिकेच्या सूचनेनुसार त्याच दिवशी अन्य पाच ठिकाणी नाश्ता, चहा तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, नवीन पनवेलमध्येच हा प्रकार घडला. तर, धक्कादायक प्रकाराबाबत खुलासा करताना थातुरमातूर कारणं देऊन त्यावर पडदा टाकण्याचा प्रकार सुरू आहे. अतिपावसात एखाद्या खाद्यपदार्थात अळ्या कशा काय पडू शकतात? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे
अतिवृष्टीत पनवेलमध्ये कुठेही पाणी साचू नये, म्हणून महापालिकेनं काटेकोर नियोजन केलं होतं. मात्र, स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या नाश्त्यात अळ्या सापडल्याच्या प्रकारामुळे पालिकेच्या नियोजनाला डाग लागला. त्यामुळे आयुक्तांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.