TRENDING:

एकनाथ शिंदेंना केंद्रात गृहमंत्री किंवा भविष्यात पंतप्रधान..., मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून संजय राऊतांचा चिमटा

Last Updated:

एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या आहेत, हे दिल्लीतील वाटरलेल्या डोळ्यांना घाबरले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत लिला रामदास, नवी दिल्ली :  महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीच सरकार स्थापण होणार आहे. पण मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत तर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचा. यावर एकनाथ शिंदे यांना केंद्रात गृहमंत्री किंवा भविष्यात पंतप्रधान करण्याचं आश्वासन भाजपने दिलं असावं, असा चिमटा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काढला आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून संजय राऊतांचा चिमटा
मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून संजय राऊतांचा चिमटा
advertisement

संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलतान संजय राऊत यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. तीन पक्षांच्या युतीला सैतानी बहुमतं मिळालं आहे. भाजपाला मित्र पक्ष मिळुन 140 जागा मिळाल्या आहेत. एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या आहेत, हे दिल्लीतील वाटरलेल्या डोळ्यांना घाबरले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

advertisement

महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या पेचावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना केंद्रात गृहमंत्री, भविष्यात पंतप्रधान करतो असं आश्वासन भाजपने दिलं असावं.त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा बनेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. पण भाजपचा शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. त्यांची भूमिका युज अँड थ्रो असते. त्यांनी फिरवलेल्या शब्दाचा सगळ्यात मोठा बळी आमची शिवसेना ठरली आहे. तसेच भाजप कधीच नैतिकता पाळत नाही,अशी टीका देखील राऊतांनी भाजपवर केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सात वाजताच होतात मोबाईल आणि टीव्ही बंद,या गावाचा कौतुकास्पद निर्णय
सर्व पहा

ईव्हीएमवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल कोर्टाने सांगितले की तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही ही चुकीची माहिती आहे. आम्ही मागच्या 10 वर्षात जिंकलो तरी आणि हरलो तरी निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या असं म्हणत आहोत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदेंना केंद्रात गृहमंत्री किंवा भविष्यात पंतप्रधान..., मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून संजय राऊतांचा चिमटा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल