कोकणची वारी आता विमानाने
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. इथं देश-विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. परंतू सिंधुदुर्ग-मुंबई सेवा बंद असल्याने त्याचा मोठा परिणाम पर्यटनावर होत होता. पण आता शासनाच्या या निर्णयामुळे सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वाढत्या पर्यटनाचा फायदा स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि खाजगी चालकांना होणार आहे.
advertisement
एवढंच नाही तर मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान दररोज विमान सेवा सुरु झाल्याने व्यापारी उलाढालही वाढेल आणि सण-उत्सवाच्या दिवसांत चाकरमान्यांना आता अजून एक नवा पर्याय उपल्बध होईल.
मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर आता काही तासांच्या अंतरावर
मुंबईला अनेक मोठ-मोठी रुग्णालय आहेत. देशभरातील अनेकजण मुंबईत येऊन उपचार घेत असतात. त्यात ही सेवा सुरु झाल्यास सिंधुदुर्गातून मुंबईला जाणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.
