खरं तर पब्जी या गेमने सगळ्या तरूणाईला वेड लावले आहे. या गेमच्या पुढे तरूणाला काही दिसत नाही. अशा गेम्सवर बंदी घालण्याचीही मागणी झाली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही आहे.अशाच पब्जीचा नाद नाशिकमधल्या एका 17 वर्षीय मुलाला होता. त्यामुळे या नादापाई कुटुंब पोरावर प्रचंड रागवायचं.
घटनेच्या दिवशी देखील मुलगा पब्जी खेळत असल्याने पाहून त्याच्या वडिलांनी त्याला हटकले. या गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला आणि तो घर सोडून निघून गेला.सूरूवातीला कुटुंबियांना वाटले तो इथेच बाहेर जाईल आणि मित्रांसोबत फिरेल. पण झालं उलटच मुलगा परतलाच नाही. त्यामुळे सरकार वाडा पोलीस ठाण्यात आईने मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.पण दोन दिवस उलटून गेले आहेत पण त्याचा अद्याप शोध लागला नाही आहे.
advertisement
तसेच मुलगा सोबत मोबाईलही घेऊन गेला मात्र फोन नॉट रिचेबल लागत असल्याने कुटुंब चिंतेत आहे.तसेच मुलगा दोन दिवसांपासून घरात न आल्याने कुटुंबिय देखील घाबरले आहेत. त्याच्याबद्दल नको नको ते विचार त्यांच्या मनात येत आहेत.आता या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश येते का? हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे.
