चैत्रोत्सवाच्या काळामध्ये, देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना खासगी वाहनाने गडावर येता येणार नाही. गडाच्या पायथ्याजवळ असणार्या नांदुरी गावापासून गडापर्यंत खासगी वाहने बंद राहणार आहे. त्या काळात 300 बसेसची सोय भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. चैत्रोत्सवाच्या काळामध्ये देवीच्या मंदिरामध्ये नऊ दिवस अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. रामनवमी अर्थात आजपासून अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या काळामध्ये भाविकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी होते.
advertisement
या सोहळ्याला लाखो भाविक उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यामुळे मंदिर ट्रस्टकडून मंदिराच्या परिसरातील खासगी वाहनांना नो एन्ट्री देण्याचे ठरवले आहे. भाविकांची गर्दी पाहता मंदिर ट्रस्टने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिर ट्रस्टने बसेसच्या सोयींसोबतच आरोग्य पथके, पाणी पुरवठा, स्वच्छता गृहे, अग्निशमन दल आणि पोलीस बंदोबस्त असे वेगवेगळे पथके या काळात तैनात करण्यात आलेले आहेत. चैत्रोत्सवाचा सोहळा आनंदात करण्यासाठी मंदिर ट्रस्टकडून पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे.
