नवरा-बायकोनं IT कंपनीतील नोकरी सोडली! एका निर्णयाने आयुष्य बदललं, या व्यवसायातून वर्षाला करताय लाखोंची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : बहुतांश लोकांसाठी स्थिर आणि चांगली नोकरी म्हणजेच यश मानले जाते. मात्र के. मणिकंता आणि नागा वेंकट दुर्गा पावनी या आंध्र प्रदेशातील दाम्पत्याने हा समज मोडीत काढत वेगळी वाट निवडली.
मुंबई : बहुतांश लोकांसाठी स्थिर आणि चांगली नोकरी म्हणजेच यश मानले जाते. मात्र के. मणिकंता आणि नागा वेंकट दुर्गा पावनी या आंध्र प्रदेशातील दाम्पत्याने हा समज मोडीत काढत वेगळी वाट निवडली. त्यांनी उच्च पगाराच्या आयटी नोकऱ्या सोडून जैविक शेती आणि ऑरगॅनिक व्यवसाय सुरू केला. लोकांना निरोगी, शुद्ध अन्न मिळावे आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.
आयटी करिअर सोडून घेतला मोठा निर्णय
दोघेही बी.टेक पदवीधर असून त्यांनी सुरुवातीला आयटी क्षेत्रात करिअर केले. मणिकंता Infosys मध्ये, तर पावनी Accenture मध्ये कार्यरत होत्या. चांगला पगार आणि स्थिर जीवन असूनही त्यांना समाधान मिळत नव्हते.
मणिकंता यांच्या मते, आयटी क्षेत्रात अनेकजण चांगली कमाई करत असले तरी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पावनी यांनाही लोकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांची चिंता वाटू लागली. याच विचारातून त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
‘श्रेष्ठ’ची संकल्पना
लोकांच्या आरोग्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी ‘श्रेष्ठ’ नावाचे ऑरगॅनिक स्टोअर सुरू करण्याचा विचार केला. चुकीच्या आहारपद्धतीमुळे वाढणारे आजार आणि ऑरगॅनिक शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अडचणी या दोन्ही समस्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे हा व्यवसाय केवळ नफा कमावण्यासाठी नसून समाजोपयोगी असावा, अशी त्यांची भूमिका होती.
शून्यातून शिकले शेतीचे धडे
शेतीचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी नव्याने सुरुवात केली. त्यांनी Subhash Palekar Natural Farming (SPNF) पद्धतीचे प्रशिक्षण घेतले. या पद्धतीत रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिक शेती केली जाते.
advertisement
मणिकंता चेन्नईमध्ये नोकरी करत असताना आठवड्याच्या शेवटी आंध्र प्रदेशातील आपल्या गावी जाऊन प्रशिक्षण घेत असत. नोकरी आणि प्रशिक्षण यांचा समतोल राखणे कठीण होते, पण बदल घडवण्याच्या ध्येयाने त्यांना प्रेरित केले.
गुंतवणूक आणि सुरुवात
2017 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देत आपल्या बचतीतील सुमारे 17 लाख रुपये ‘श्रेष्ठ’मध्ये गुंतवले. सुरुवातीला त्यांच्याकडे दुकानही नव्हते. मणिकंता स्वतः शेतकऱ्यांकडून उत्पादने घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवत होते.
advertisement
आंबा, बाजरी पीठ, तूर डाळ आणि हेल्थ मिक्स पावडर यांसारख्या ऑरगॅनिक उत्पादनांपासून त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली.
शेतकऱ्यांसाठी ठरला आधार
‘श्रेष्ठ’चा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सक्षम करणे हा होता. त्यांनी ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करून त्यांना योग्य दर दिला.
कृष्णा जिल्ह्यातील शेतकरी महा लक्ष्मन यांनी सांगितले की, पूर्वी ऑरगॅनिक आंब्याला योग्य किंमत मिळत नव्हती. पारंपरिक बाजारात त्यांना सुमारे 2 लाख रुपये मिळत होते, मात्र ‘श्रेष्ठ’सोबत काम केल्यानंतर त्यांची कमाई दुप्पट होऊन 4 लाखांपर्यंत पोहोचली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 7:22 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
नवरा-बायकोनं IT कंपनीतील नोकरी सोडली! एका निर्णयाने आयुष्य बदललं, या व्यवसायातून वर्षाला करताय लाखोंची कमाई








