2 तासांत लिहिलं गीत, मिनिटांत बांधली चाल; पुण्यात रेकॉर्डिंगच्या आधी ओढावलेलं संकट, गदिमा-फडकेंच्या 'गीतरामायण'ची Untold Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Geet Ramayan Untold Story : अनेक दशके श्रोत्र्यांच्या मनाला भिडणारं गीतरामायण. गदिमा आणि सुधीर फडकेंच्या जोडीच्या अजरामर गीतांमागची खरी स्टोरी माहितीये का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रात्री उशिरा बाबूजी स्टुडिओत पोहोचले. सगळे त्यांची वाट पाहत होते. रेकॉर्डिंगला सुरुवात करायची तयारी झाली तेवढ्यात बाबूजींनी गाण्याचा कागद मागितला. इथेच खरी अडचण उभी राहिली. गदिमा म्हणाले, मी तो कागद तुला दिला, तर बाबूजी म्हणाले, मी तुझ्याकडेच दिला. दोघांमध्ये गोंधळ आणि वाद सुरू झाला. रेकॉर्डिंगच्या अवघ्या 2 तास आधी गीताचे शब्दच गायब झाले होते.
advertisement
या गोंधळात आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत यांनी मध्यस्थी करत गदिमांनी पुन्हा गीत लिहावं आणि बाबूजींनी त्यावर नव्याने चाल बांधावी असा तोडगा सुचवला. वेळ अत्यंत कमी होता पण या दिग्गजांनी हार मानली नाही. गदिमांनी अवघ्या काही वेळात ते गीत पुन्हा लिहिलं आणि कागद बाबूजींच्या हाती दिला. बाबूजींनीही क्षणात त्या शब्दांना सुरांची जोड दिली.
advertisement
advertisement









