नाशिक आणि परिसरामध्ये दोन अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आले आहे. त्यातील एका मुलीचं अपहरण नाशिकमधील पंचवटीतील नवनाथ नगरमध्ये घडली असून दुसरी घटना भगूरमध्ये घडली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये घडल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिकच्या पंचवटीतील नवनाथ नगरमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. दिवसाढवळ्या पंचवटीमध्ये मुलीचे अपहरण झाल्यामुळे नाशिककरांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. सकाळी 10.30 वाजता ती मुलगी घराबाहेर गेली होती. बराच वेळ झाला तरीही ती घरी आली नाही. त्यामुळे तिच्या वडीलांनी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडीलांनी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करताना व्यक्त केला. तर कालच्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील भगूरमध्ये रात्री 11 च्या सुमारास अपहरणाची घटना घडली आहे. रात्री 11 वाजता ती अल्पवयीन मुलगी कुत्र्याला चपाती देते असं कारण देत ती घराबाहेर पडली. परंतू ती बराच वेळ झाला घरी काही परतली नाही. कुटुंबीयांसह शेजारच्या लोकांनीही तिचा आजूबाजूच्या परिसरामध्ये बराच शोध सुद्धा घेतला. पण ती काही सापडली नाही. शेवटी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. तिच्या अपहरणाचा गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे.
एकाच दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडल्यामुळे सध्या पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत. पोलीस ॲक्टिव्ह मोडवर येताच पोलिसांकडून कारवाईचे चक्रे फिरवले गेली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी मुलींचा शोध घेतला जात असून सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी केली जात आहे. शिवाय, पोलिसांकडून संशयींची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून काही माहिती मिळतेय का? याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
