छगन भुजबळ म्हणाले की, एकतर मनुस्मृतीला सगळ्यांचा विरोध आहे. महिलांच्याबाबत घाणेरडे लिखाण आहे. त्यांना शिक्षणाचे अधिकार नाही. खूप काही लिखाण आहे. त्यात मराठी अनुवाद सुद्धा आहे. त्यात वाचा काय लिहिलेलं आहे. त्याचातुन स्पष्ट दिसत आहे. 14 महापंडीतांनी त्यावर टीका केली आहे. अनेक लेखकांनी निषेध केला आहे.
आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक, राज्यभरात आंदोलन; कुत्र्याच्या गळ्यात फोटो अडकवून निषेध
advertisement
अचानक हे सगळं कसं आलं. अभ्यासात मनुस्मृतीचा चंचूप्रवेश कशाला पाहिजे? जी लोकांना नको आहे. याच्या पाठीमागे काय चाललंय हे शोधलं पाहिजे. बहुजन मंत्री दीपक केसरकर याची भलाभल करतात मला विशेष वाटलं. पण आम्ही त्याचा विरोध करु असं भुजबळांनी स्पष्ट केलं.
जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केलं तेव्हा त्यांच्याकडून झालेल्या कृतीवर भुजबळ यांनी म्हटलं की, त्यांची भावना चांगली होती. चुकून त्यांनी बाबासाहेब यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले. सगळ्यांनी त्याचे अनुकरण केले पण त्यांनी माफी मागितली. विरोधी पक्षाचे आहे म्हणून टीका करणार असे नाही.
मनुस्मृतीवरील फोकस कमी व्हावा म्हणून आव्हाड आव्हाड करू नका. मनुस्मृतीचा चंचू प्रवेश अभ्यासात नको. आव्हाड चुकले असेल म्हणून भाजपने आंदोलन केलं असेल. फडणवीस सुद्धा म्हणाले शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश होणार नाही. ते म्हणाले तसे ते वागतील अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली.
