नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
माझी एखादी गोष्ट सुरुवातीला कडवट वाटते, पण ती सत्य असते. मी तेव्हाच जरांगे पाटलांना सांगितलं होतं, त्यांची मागणी मान्य होणार नाही. विजय झाला मग पुन्हा उपोषणाला का बसता असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांन केला आहे. आंदोलनात नेमकं काय घडलं हेच आंदोलकांना कळालं नाही. मराठा आरक्षण हा तांत्रिक विषय आहे, आरक्षणाची वस्तूस्थिती समजून घेतली पाहिजे, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
advertisement
लोकसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या चाचपणी चालू आहे, ज्यांची सत्ता आहे, ते पण चाचपणी करतात मग आम्ही नको का करायला? चाचपणीनंतर निर्णय घेतला जाईल. राज्यातील सर्व जागा लढवाव्यात अशी पक्षातून मागणी असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.