नुकतंच मंदिर प्रशासनाच्या झालेल्या नियोजन बैठकीत सप्तश्रृंगी देवीचे मंदिर चैत्र नवरात्रोत्सवाच्या काळात 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, या काळामध्ये गडावर खासगी वाहनांना बंदीही घालण्यात आलेली आहे. या काळामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी नांदूरी येथे गाड्या पार्किंगचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या दिवसांमध्ये भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यासाठी मंदिर आणि गडाच्या परिसरामध्ये कायदा- सुव्यवस्था, भाविकांसाठीची सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक आणि आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरमधील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेला मारहाणीची घटना ताजी असताना सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरातही भाविकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रीच्या काळामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुरक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. फुलविक्रेत्याकडून किंवा इतर कोणत्याही विक्रेत्यांकडून सोबतच मंदिरातील कोणत्याही कर्मचार्याकडून भाविकांना मारहण झाली किंवा त्यांना त्रास देण्यात आला तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा कळवणचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिला आहे.
