TRENDING:

ज्या विठ्ठल मुर्ती घोटाळ्यावरून पिंपरी चिंचवडमधून NCP ची सत्ता गेली, तो मुद्दा दादांनी पुन्हा उकरून का काढला? बरोबर डाव टाकला!

Last Updated:

PCMC Election 2026: पिंपरी चिंचवड शहरावरील गमावलेले वर्चस्व पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : अजित पवार यांच्या नेतृत्वात झेपावलेले पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या ताब्यात गेल्याने ते पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. २०१७ पर्यंत अजित पवार यांचे शहरावर एकहाती वर्चस्व होते. मात्र तत्कालिन आणि आताचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सूक्ष्म रणनीती आखून अजित पवार यांचे वर्चस्व ठरवून मोडित काढले. अजित पवार यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये आणून फडणवीस यांनी आव्हान उभे केले. दरम्यानच्या पाच वर्षात पुलाखालन बरेच पाणी वाहून गेले आहे. सध्या सत्तेत एकत्र असले तरी पिंपरी चिंचवड महापालिका आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजपमध्ये निकराची लढाई होत आहे. अजित पवार यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडून एकप्रकारे वात पेटवली. तसेच २०१६ साली ज्या विठ्ठल मुर्ती घोटाळ्यावरून राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवडची सत्ता गेली, तो मुद्दा पुन्हा उकरून काढत भाजप काळातील पालिकेतील भ्रष्टाचार याच मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचे एकप्रकारे सूचित केले.
पिंपरी चिंचवडमधील विठ्ठल मुर्ती घोटाळा काय आहे?
पिंपरी चिंचवडमधील विठ्ठल मुर्ती घोटाळा काय आहे?
advertisement

अजित पवार यांच्याच नेतृत्वात २०१७ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक लढला. मात्र शहराचा चौफेर विकास केल्याचा दावा करूनही राष्ट्रवादीच्या वाट्याला निराशा आली. ज्या विठ्ठल मुर्ती घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीविरोधात रान उठवले, त्या मुद्द्याला पिंपरी चिंचवडकरांनी साथ दिली. आता तोच मुद्दा आठ नऊ वर्षांनी अजित पवार यांनी पुन्हा जिवंत करून भ्रष्टाचाराच्याच मुद्द्यावरून भाजपवर प्रहार करणार असल्याचे संकेत दिले.

advertisement

पिंपरी चिंचवडमधील विठ्ठल मुर्ती घोटाळा नेमका काय होता?

आषाढी एकादशीच्या निमित्ताने २०१६ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वारीतील दिंडी प्रमुखांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. या मूर्तींच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केला होता. बाजारात मूर्तींची किंमत अत्यंत कमी होती, मात्र अव्वाच्या सव्वा दराने किंबहुना अंदाजे दुप्पट ते तिप्पट किमतीत महापालिकेने मूर्ती खरेदी केल्याचा आरोप भाजपने केला.

advertisement

​परिणामी २०१७ च्या निवडणुकीत भाजपने विठ्ठल मूर्ती घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर सनसनाटी आरोप केला. देवाच्या मूर्तींच्या खरेदीतही राष्ट्रवादीने पैसे खाल्ले, असा प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. लोकांनीही भाजपच्या प्रचाराला साथ देऊन सत्तेवर आणले.

भाजपच्या आरोपांची चौकशी झाली, समोर पुरावे सापडले नाहीत

​भाजपने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. चौकशी अहवालानुसार, या खरेदीत आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट पुरावे सापडले नाहीत, मात्र प्रशासकीय अनियमितता झाल्याचे पुढे आले. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल महापालिकेतील एका लेखापालाची आणि एका कारकुनाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली होती.

advertisement

अजित पवारांनी हा मुद्दा आत्ताच का काढला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, तुरीचे वाढले भाव, सोयाबीनची काय स्थिती? Video
सर्व पहा

अजित पवारांनी आज हा मुद्दा का काढला? कारण ​या जुन्या मुद्द्याचा संदर्भ देऊन अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केल्याची चर्चा आहे. मूर्ती खरेदी प्रकरणात केवळ आरोप झाले मात्र तसा तो घोटाळा नव्हताच. पण सध्या भाजपच्या सत्ता काळात रस्ते, निविदा आणि थेट महापालिकेच्या ठेवींमध्येच घोटाळे होत आहेत. ​मग जनता एवढ्या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणार का? असा सवाल करून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून अजित पवार भाजपला खिंडीत गाठू पाहत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्या विठ्ठल मुर्ती घोटाळ्यावरून पिंपरी चिंचवडमधून NCP ची सत्ता गेली, तो मुद्दा दादांनी पुन्हा उकरून का काढला? बरोबर डाव टाकला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल