पत्रा कापून चालकाला काढले बाहेर
अपघाताची भीषणता इतकी भयानक होती की, रिक्षा उलटल्यानंतर चालक आतमध्येच अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे जवान देवदूतासारखे धावून आले. रिक्षामध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी जवानांना रेस्क्यू टूल्सच्या सहाय्याने रिक्षाचा पत्रा कापावा लागला. अत्यंत शर्थीच्या प्रयत्नांनंतर जखमींना बाहेर काढून तात्काळ घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
advertisement
दोघांचा जागीच मृत्यू, दोन तरुणी जखमी
घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती दोघांना मृत घोषित केले. या भीषण अपघातात रईस हासिम शेख आणि रुक्मिणी येणगे या दोघांचा करुण अंत झाला. तर शितल मोरे आणि पायल वरदे या दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
हे सर्वजण रांजणगाव येथील शिवनेरी कॉलनीतील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. एकाच परिसरातील दोघांचा मृत्यू झाल्याने शिवनेरी कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्यरात्रीच्या शांततेत झालेला हा थरार आणि त्यानंतर बसलेला हा धक्का मृतांच्या कुटुंबियांसाठी सुन्न करणारा आहे.
