आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विनायक मासाळ विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला.
दिघंची गटामध्ये देखील असाच चुरशीचा मुकाबला होत असून, तिथे जिल्हा बँक संचालक तानाजी पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील (शिवसेना शिंदे गट) रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे कल्लाप्पा कुटे उभे असून, दोन युवा नेत्यांमधील या संघर्षामुळे दिघंची गटात विजयाचे गणित लावणे कठीण झाले आहे. या गटामध्ये झालेली चुरस ही संपूर्ण तालुक्याच्या निकालाची दिशा ठरवणारी ठरेल.
advertisement
आज सकाळी 10 वाजल्यापासून आटपाडी येथे मतमोजणीला सुरुवात झाली असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुक्यातील 4 गट आणि 8 गणांचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पडळकर आणि देशमुख यांच्या गटाची सत्ता कायम राहते की तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट मुसंडी मारतो, याचा फैसला आता काही क्षणांतच होईल.
