TRENDING:

वाल्मिक कराडचा नवा डाव, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींकडून D2 ऑपरेशन; नेमकं आहे तरी काय?

Last Updated:

Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून डी टू ऑपरेशन सुरू आहे, या संदर्भात न्यायालयात तक्रार करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींकडून खटला लांबवण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू असल्याचं सांगत सरकारी वकील उज्वल निकम यांनी वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जांवर कडाडून विरोध केला आहे . खटल्यातील आरोपींकडून D2 ऑपरेशन सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती होती.
Walmik Karad
Walmik Karad
advertisement

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून डी टू ऑपरेशन सुरू आहे. या संदर्भात न्यायालयात गंभीर स्वरूपाची तक्रार केली असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. D फॉर डीले द ट्रायल अँड डी फॉर डिरेल the ट्रायल हे सुरू आहे, असा दावा केला आहे. उज्ज्वल निकम म्हणाले, आरोपींकडून वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अर्ज केले जात आहेत. या खटल्याची सुनावणी लांबविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने स्पष्ट केले त्यातील काही आरोपींनी त्यांना मकोका खटल्यातून दोष मुक्त करावे असा अर्ज दिला आहे आम्ही न्यायालयाला विनंती केली. या खटल्याचे जे अर्ज त्याची सुनावणी लवकर घ्यावी.

advertisement

देशमुख हत्या प्रकरणातील तीन ते सात क्रमांकाचे जे आरोपी आहेत त्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला. सीआयडीने एकत्रित आरोप पत्र दाखल केले आहे हे चुकीचे आहे. हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही. हा अधिकार केवळ न्यायालयाला आहे यावर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूर येथील अंजनाबाई गावित खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला आहेचसत्या अनुषंगाने न्यायालयाने आरोपी क्रमांक तीन ते सात यांच्यावरील दोष मुक्तीचा अर्ज याची सुनावणी 24 तारखेला ठेवली आहे.

advertisement

वाल्मिक कराडच्या वकिलाने न्यायालयात काय युक्तिवाद केला? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

आज वाल्मिक कराडच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला. त्याने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिले आहे. त्यावर आरोप निश्चित करणे गरजेचे आहे, आरोपी हे आरोपपत्र दाखल झाल्यापासून चार्जफ्रेम झाला नाही, असे गाऱ्हाणे करत असतात.उच्च न्यायालयाने स्टे दिला नसेल तर आरोपी निश्चिती करावी. आरोपी क्रमांक तीन ते सात त्या संदर्भात 24 तारखेला निर्णय दिल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होणार आहे.  औरंगाबाद उच्च न्यायालयाने नोटीस दिलेली नाही. वाल्मिक कराडच्या अर्जावर त्याची सुनावणी 19 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे आहे.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाल्मिक कराडचा नवा डाव, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींकडून D2 ऑपरेशन; नेमकं आहे तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल