TRENDING:

जिल्हा परिषद निकाल: महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपची सरशी; 'फडणवीस-चव्हाण' रणनीती यशस्वी

Last Updated:

12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीत भाजपने 8 जिल्हा परिषद, 50 पेक्षा जास्त पंचायत समित्या जिंकल्या. फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे विजयाची हॅटट्रिक.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने आपला दबदबा कायम राखला. 12 पैकी 8 जिल्हा परिषदांवर भाजपची सत्ती येणार असल्याचं चित्र अगदी स्पष्ट झालं. तर पंचायत समित्यांमध्ये देखील 50 हून जास्त पंचायत समित्या या भाजपकडेच असतील असं स्वत: मुख्यमंत्री फडणवीस निकालानंतर म्हणाले. महायुतीमधील मित्रपक्ष आणि विरोधी महाविकास आघाडीला मागे टाकत भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपने मोठे यश मिळवल्याने, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने आपले स्थान बळकट केल्याचे मानले जात आहे.
News18
News18
advertisement

यशाचे त्रिसूत्री नियोजन

या निवडणुकीत भाजपच्या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची संघटनात्मक बांधणी महत्त्वाची ठरली. गेल्या काही महिन्यांतील नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपने आघाडी घेतल्याने पक्षाची 'विजयाची हॅटट्रिक' पूर्ण झाली आहे.

या विजयाची तीन प्रमुख कारणे

स्थानिक आणि राज्य नेतृत्वाचा समन्वय: बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांचा थेट संपर्क प्रदेशाध्यक्षांशी ठेवण्यात आला.

advertisement

विकासकामांचा अजेंडा: सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आलेले यश.

सूक्ष्म निवडणूक व्यवस्थापन रविंद्र चव्हाण यांनी निवडणुकीच्या काळात प्रत्येक मतदारसंघातील जातीय आणि सामाजिक समीकरणांचा अभ्यास करून आखलेली रणनीती.

विरोधकांचे आव्हान ठरले तोकडे

महाविकास आघाडीने या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, भाजपच्या आक्रमक प्रचार यंत्रणेसमोर विरोधकांचा प्रचार अनेक ठिकाणी तोकडा पडल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात, जिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद मोठी मानली जाते, तिथेही भाजपने मुसंडी मारली आहे.

advertisement

रविंद्र चव्हाण यांचा वाढता प्रभाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मोकळीक यामुळे पक्षयंत्रणा अधिक सक्षमपणे राबली. जमिनीवर वावरणारा नेता म्हणून चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला, ज्याचा सकारात्मक परिणाम निकालात उमटला आहे. या विजयामुळे भाजपमधील उत्साह वाढला असून, आता उर्वरित टप्प्यांसाठी आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाने 'मिशन महाराष्ट्र' अधिक वेगाने राबवण्याचे संकेत दिले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिल्हा परिषद निकाल: महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपची सरशी; 'फडणवीस-चव्हाण' रणनीती यशस्वी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल