भारत हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोबतच तो पोलीस भरतीचीही तयारी करत होता. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत रिक्षा चालवल्यानंतर, तो शेळगी परिसरातील चौकात रिक्षा लावून मित्र गिरीश माळगेसोबत हिप्परगा तलाव परिसरात गेला. उन्हाचा कडाका असल्याने तलावातील पाणी पाहून दोघांनाही पोहण्याचा मोह झाला. कपडे काठावर काढून दोघांनीही पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले.
advertisement
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वडाळ्यात 2 महिने वाहतूक बदल, या पर्यायी मार्गाचा करा वापर
तलावाच्या काठावर कपडे पाहून नागरिकांनी संशय घेतला आणि मोबाइल क्रमांकावरून नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने सायंकाळी सहाच्या सुमारास भारतला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. भारतचे पुढील महिन्यात लग्न ठरले होते, त्यामुळे सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भारतसोबत असलेला गिरीश माळगे अद्यापही बेपत्ता आहे. अंधार पडल्यामुळे सोमवारी सायंकाळी शोध मोहीम थांबवण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात येणार आहे. भारतच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे, तर त्याचे वडील यार्डात भाजी विक्रीचे काम करतात. या घटनेमुळे शेळगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






