होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक विभागातील ४५० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नाका बंदीसाठी तैनात करण्यात आले होते. होळी-धूलिवंदन कालावधीत मद्य प्राशन करून किंवा नशा करून वाहन चालविणार्या चालकांवर कारवाई करण्याची व्यूहरचना वाहतूक विभागाने केली होती.
पाच परिमंडळात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. या नाकाबंदीत नशापान किंवा मद्यप्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्या तब्बल १९६ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर ८३६ विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे, ४०८ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ऑटो रिक्षामध्ये फ्रंट सीट घेणाऱ्या २२७ चालकांवर कारवाई केली असुन विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या १४ वाहन चालकांना देखील पकडण्यात आले होते. अशा एकूण १६८१ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्या धुळवडीचा रंग पोलिसांनी उतरवलाय.
advertisement
