TRENDING:

Uttarakhand Flood: महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी; उत्तराखंडमध्ये पुणे, जळगावचे 37 भाविक बेपत्ता, संपर्क तुटला

Last Updated:

जळगावमधील 13 जण तर पुण्यातील 24 जण बेपत्ता असून गेल्या 24 तासात त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव: उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धराली गावात ढगफुटीसारखा पाऊस आणि भूस्खलनामुळं हाहाकार उडालाय.. या धगफुटीमुळं धराली गावातील अनेक घरं आणि बिल्डिंग जमीनीखाली गाडली गेलीत.या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.दरम्यान महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. जळगावमधील 13 जण तर पुण्यातील 24 जण बेपत्ता असून गेल्या 24 तासात त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.
News18
News18
advertisement

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एकाच भागात राहणारे 13 तरुण मागील आठ दिवसापासून उत्तराखंड येथे देवदर्शनाला गेले होते. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील 13 तरुणांसोबत मागील 24 तासापासून संपर्क न झाल्यामुळे संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. महिलांसह पालकांच्या डोळ्यात चिंतेचे अश्रू असून आमच्या मुलांसोबत लवकरात लवकर संपर्क प्रशासनाने करून द्यावा, अशी मागणी बेपत्ता तरुणांच्या नातेवाईकांनी केली आहे.

advertisement

पुण्यातील 24 जण बेपत्ता

आंबेगाव तालुक्याच्या अवसरी खुर्द गावातील 24 नागरिक अडकले असल्याची माहिती मिळत आहे. मागील 24 तासांपासून या नागरिकांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंता आणि अस्वस्थता आहे. अवसरी खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील सन 1990 च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे 24 वर्ग मित्र व वर्ग मैत्रिणी तीर्थयात्रेसाठी उत्तराखंड येथे गेले होते.

advertisement

गंगोत्रीकडे निघालो असा शेवटचा मेसेज

उत्तरकाशी येथील घटना घडण्यापूर्वी यातील काही लोकांनी "आम्ही गंगोत्रीकडे निघालो" असल्याचे स्टेटस ठेवले होते. मात्र हाच त्यांच्याकडून मिळालेला शेवटचा संदेश असून त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, गंगोत्रीतील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत,मात्र ढगफुटीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.

advertisement

पालकांच्या डोळ्यात चिंतेचे अश्रू

महिलांसह पालकांच्या डोळ्यात चिंतेचे अश्रू असून सर्व तरुण सुखरूप परत यावे म्हणून सर्व ग्रामस्थ परमेश्वर चरणी प्रार्थना करीत आहे. बेपत्ता तरुणांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uttarakhand Flood: महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी; उत्तराखंडमध्ये पुणे, जळगावचे 37 भाविक बेपत्ता, संपर्क तुटला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल