मुंबईहून बारामतीला निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बारामतील येथील विमान दुर्घटना अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा दावा केला आहे. अजित पवारांच्या मृत्यूविषयी ना-ना प्रकारचे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना रोहित पवारांच्या आरोप केल्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. आज देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात अपघाताविषयी चौकशीत जी माहिती समोर आली ती सभागृहात आज सादर केली.
advertisement
कोणत्या पायलटची नियुक्ती केली होती?
देवेंद्र फडणवीस म्हणाली, बारामती विमानतळावर विमान लँड होण्यापूर्वीच दुर्घटना झाली आहे. अजति पवारांच्या अपघाताचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. पायलटची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आल्याचे तपासात समोर आले आहे. अजति पवारांच्या विमानाच्या पायलटची नेमणूक 27 जानेवारी रोजी रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी करण्यात आली होती. यावेळी तात्पुरत्या स्वरुपात विमानाचे क्रू डिटेल्समध्ये साहिल मदान आणि यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्टला करण्यात आला होता. अशा प्रकारे स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे. त्यानंतर पायलट आणि को पायलटची नेमणूक करण्यात येते असे VSR कंपनीकडून सांगण्यात आले.
पायलटची शिफ्ट का बदलण्यात आली?
व्हीएसआर कंपनीच्या ऑपरशेन टीमने शेड्युल दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंह को पायलट म्हणून 10 वाजून 42 मिनिटांनी नेमले, परंतु पायलट ओबेरॉय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांनी सकाळच्या फ्लाईटऐवजी संध्याकाळी लातूरला जाणाऱ्या प्लाईटवर ड्युटी द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर लगेच व्हीएसआरच्या टीमने त्यांच्याऐवजी सुमीत कपूर आणि को पायलट शांभवी पाठक यांची नेमणूक केली. त्यानंतर कंपनीने शिफ्ट रोस्टर व्हॉट्सअॅप ग्रुपवर रात्री 11 वाजून 54 मिनिटानी संबंधित पाठवले. त्यामुळे ऐनवेळी नेमणूक करण्यात आली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
