मात्र, विद्यार्थ्यांना दिलेला पोषण आहार भलत्याच कारणाने चर्चेत असून विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पोषण आहारात चक्क तांदळाएवढ्या आकाराच्या आळ्या निघाल्या आहेत. हा प्रकार यवतमाळमधील आर्णीच्या गांधीनगर येथील श्रीमद भारती शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमधून उघडकीस आला आहे.
आर्णी शहरातील गांधीनगर येथील श्रीमद भारती शाळेत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे चॉकलेट वितरीत करण्यात आले. चॉकलेट घेऊन विद्यार्थी घरी गेले. परंतु, महालक्ष्मीनगर येथे वास्तव्यास असलेल्या इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुजफ्फर इकबाल शेख या विद्यार्थ्याने चॉकलेट घरी गेल्यानंत उघडून खाताच चॉकलेट खराब लागत असल्याचे त्याने आपल्या पालकांना सांगितले.
advertisement
Satara : भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार? जयंत पाटलांनी घेतली बड्या नेत्याची भेट
त्यामुळे पालकांनी शाळेतून मिळालेल्या त्या कॉफी कलर चॉकेलेटचे पाकीट फोडून पाहणी केली असता त्या पाकिटात तांदळाएवढ्या आकाराच्या आळ्या दिसून आल्याने पालकांना धक्काच बसला. पालकांनी इतर चॉकलेट ही उघडून बघितले असता त्यात बुरशी चढुन आळ्या असल्याचे दिसून आले. सकस आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी शिक्षण विभाग खेळत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे.