बीड : शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेती या व्यवसायाला अधिक महत्त्व वाढत आहे. शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. बीडमधील आज एका अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जे रेशीच्या शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
advertisement
ST च्या ताफ्यात येणार 5 हजार नवीन बस, पैकी 1310 असणार भाडेतत्त्वावर, कशी असेल नेमकी प्रक्रिया
बाळासाहेब वानखेडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मागील 4 वर्षांपासून रेशीम शेतीचा व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कमी क्षेत्रामध्ये त्यांना अधिक उत्पन्न मिळवून दाखवले आहे. एक एकरात त्यांनी रेशीमच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून येते. सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बाळासाहेब वानखेडे यांना 3 लाख रुपयांचा खर्च आला होता.
झाडांचे संगोपन करणे. त्याचबरोबर पानांवरती कीटकांचा कसलाही प्रादुर्भाव वाढू नये, याची ते वेळोवेळी काळजी घेतात. 4 वर्षांपूर्वी बाळासाहेब वानखेडे यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेती या व्यवसायाची सुरुवात केली होती. पण दिवसेंदिवस या व्यवसायात त्यांनी चांगली प्रगती केली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून बाळासाहेब वानखेडे हे वर्षाला 5 ते 6 लाखांची कमाई करत आहेत.