जालना जिल्ह्यातील पानेवाडीचे मनोज चव्हाण आणि त्याचे बंधू उद्धव चव्हाण यांची 30 एकर शेती आहे. यापैकी सात एकर क्षेत्रावर त्यांनी 1200 मोसंबी बागेची लागवड केली आहे लागवड केल्यानंतर या झांडांना योग्य खत मात्रा देऊन त्यांचा सांभाळ केला. चार वर्षानंतर त्यांना यापासून मोसंबीचे उत्पन्न सुरू झाले. त्यांनी मागच्या वर्षी आंबिया बहरची 55 टन मोसंबी 25 हजार रुपये प्रति टन या दराने विकली यातून त्यांना 14 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. तर सध्या त्यांच्या मोसंबी बागेत 70 ते 80 टन मोसंबी असून यातून त्यांना 17 ते 18 लाख रुपये उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे.
advertisement
‘ही’ कीड नष्ट करते नारळाची संपूर्ण बाग, शेतकऱ्यांनो, तातडीनं घ्या काळजी
ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मोसंबी तोड झाल्यानंतर ते वाळलेल्या फांद्यांची छाटणी करतात. त्यानंतर डीएपी आणि सुक्ष अन्नद्रव्ये असणाऱ्या खतांचा बेसल डोस झाडाला प्रति झाड सव्वा ते दीड किलो दिला जातो. पिकावर असलेल्या कीटक नुसार दोन ते तीन फवारण्या ते घेतात. तसेच उन्हाळ्यात शेणखताची मात्रा देखील झाडांना दिली जाते. अशा पद्धतीने योग्य नियोजन करून पानेवाडीचे मनोज चव्हाण मोसंबी बागेतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
वीज बिलाच्या टेन्शनमधून होईल शेतकऱ्याची सुटका! 'या' सरकारी योजनेला जबरदस्त प्रतिसाद
इतर शेतकऱ्यांनी मोसंबी पिकाची लागवड करावी. योग्य नियोजन करून झाडांची काळजी घ्यावी. मोसंबी पिकाचे योग्य व्यवस्थापन केलं तर या पिकातून आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो, असा अनुभव चव्हाण यांनी सांगितला.