आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारतासाठी आहे. १२ वर्षांपासून नियोजनबद्ध कारभार सुरू आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढत आहे. लोकांचे जीवनमान सुधारण्याचे काम सुरू आहे. दारिद्र्य कमी करण्यावर यशस्वी ठरत आहोत.
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, विशेषतः भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंवरील सीमाशुल्क कमी केले जात आहे. काही वस्तूंचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, चामडे आणि कापडांची निर्यात देखील शुल्कमुक्त असेल. या वस्तूंवरील सीमाशुल्क कमी केले जात आहे. संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमाशुल्क माफ केले जातील. क्रीडा साहित्य आणि खेळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
advertisement
>>> स्वस्त काय, महाग काय?
>> स्वस्त
- चामड्याच्या वस्तू
- सिंथेटिक पादत्राणे
- लेदर उत्पादने
- १७ कर्करोग आणि मधुमेहावरील औषधे शुल्कमुक्त
- लिथियम-आयन पेशी
- मोबाइल बॅटरी स्वस्त होतील
- सोलार ग्लास (सौर पॅनेल काच) स्वस्त होतील
- मिश्र वायू (सीएनजी)
- ईव्ही
- मायक्रोवेव्ह ओव्हन
- परदेश प्रवास
> कोणत्या वस्तू होणार महाग?
आयात शुल्कात वाढ केल्याने काही गोष्टी महाग होणार आहेत. यामध्ये मद्य, भंगार, खनिजं या गोष्टीदेखील महाग होणार आहे.
